भात

भातावरील जिवाणूजन्य कडा करपा

Xanthomonas oryzae pv. oryzae

जीवाणू

5 mins to read

थोडक्यात

  • पानांवर राखाडीसर हिरवे पट्टे निर्माण होतात.
  • पान पिवळे पडुन हळुहळु मरगळतात.
  • पानांतुन दुधाळ स्त्राव झिरपतो.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

भात

लक्षणे

कोवळ्या रोपांची संक्रमित पाने प्रथम पिवळी ते गव्हाळ होऊन नंतर मरगळुन वाळतात. पक्व रोपांत प्रादुर्भावाचा काळ हा मुख्यत: फुटव्यांपासुन ते ओंबी तयार होईपर्यंतचा असतो. पक्व रोपांवर सुरुवातीला पानांवर फिकट हिरवे ते राखाडीसर हिरवे, पाणी शोषल्यासारखे पट्टे निर्माण होतात. कालांतराने हे पट्टे एकमेकात मिसळतात आणि मोठ्या पिवळसर ओबड धोबड कडा असलेल्या डागात रुपांतरीत होतात. पाने पिवळी पडून वाळतात. संक्रमणाच्या शेवटच्या टप्प्यावर, पानांतुन जीवाणूंचा दुधाळ स्त्राव झिरपताना दिसतो. हा स्त्राव नंतर सुकुन पांढर्‍या खपल्या तयार होतात. या गुणधर्मामुळे काही खोड किड्यांच्या नुकसानापासुन या रोगाला वेगळे काढता येते. जिवाणूजन्य करपा हा भातावरील फार विनाशकारी रोगातील एक आहे.

Recommendations

जैविक नियंत्रण

आजतागायत भातावरील कडा करप्याच्या नियंत्रणासाठी कोणतेही जैविक उत्पाद बाजारात उपलब्ध नाहीत. कॉपरवर आधारीत उत्पादांच्या वापराने लक्षणे कमी होऊ शकतात पण रोगाचे नियंत्रण केले जात नाही.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. कडा करप्याचा मुकाबला करण्यासाठी अधिकृत प्रतिजैवके + कॉपर ऑक्सिक्लोराइड किंवा कॉपर सल्फेटच्या बीजप्रक्रियेची शिफारस करण्यात येते. प्रतिजैवकांचा वापर काही देशात वर्जित आहे म्हणुन आपल्या देशात वापरण्यात येणारे उपाय तपासा.

कशामुळे झाले

झँथोमोनाज ओरिझे पीव्ही. ओरिझे नावाच्या जीवाणूमुळे लक्षणे उद्भवतात जो गवती तण, संक्रमित रोपांच्या अवशेषात जगतो. या जंतुंचे वहन वारा, पावसाचे किंवा सिंचनाचे पाणी उडण्याने होते. म्हणुन वाईट हवामान (वारंवार पाऊस, वारा) उच्च आर्द्रता (७०% वर), आणि उबदार तापमान (२५ ते ३० अंश) असल्यास या रोगाच्या घटना आणि गंभीरता वाढते. उच्च नत्र पातळी असलेली खते किंवा खूप दाट लागवड खासकरुन संवेदनशील वाणात देखील या रोगास अनुकूल आहेत. जितक्या लवकर रोग संक्रमण होते तितका जास्त उत्पादनाचा नाश होतो. ओंबी विकसित होण्याच्या काळात संक्रमण झाल्यास उत्पादनात घट होत नाही पण फुटलेल्या धान्याचे प्रमाण वाढते. उष्णकटिबंध आणि समशीतोष्ण वातावरणात, विशेषत: सिंचीत आणि कोरडवाहू खोलगट भागात हा रोग होतो.


प्रतिबंधक उपाय

  • फक्त निरोगी, शक्य झाल्यास प्रमाणित स्त्रोतांकडील बियाणेच वापरा.
  • ह्या जंतुंचे नियंत्रण करण्यासाठी प्रतिकारक वाण लावणे हाच प्रभावी आणि भरवशाचा (आणि स्वस्त) उपाय आहे.
  • रोपणीच्या वेळी रोपांना काळजीपूर्वक हाताळा.
  • रोगाचा प्रसार टाळण्यासाठी शेत आणि रोपवाटिकेत पाण्याचा निचरा चांगला होऊ द्या.
  • हंगामात नत्रयुक्त खतांचे समायोजन करा आणि जास्त नत्र दिले जाऊ नये म्हणुन विभाजित वापर करा.
  • जेव्हा हवामान परिस्थिती अनुकूल असते तेव्हा शेवटच्या नत्र विभाजित मात्रेबरोबर पोटॅश थोडे जास्त द्या.
  • युरियाच्या रुपात नत्र देणे टाळा.
  • शेतातील आणि आजुबाजुचे तण आणि पर्यायी यजमान नष्ट करा.
  • भाताचे धसकट, तूस आणि स्वयंभू रोपांना नांगरून जमिनीत गाडा कारण ते जंतुंचे पर्यायी यजमान होतात.
  • जमिनीतील आणि रोपांच्या अवशेषातील जंतु मरण्यासाठी दोन हंगामादरम्यान शेत कोरडे (पडिक) राहू द्यात.

प्लँटिक्स डाऊनलोड करा