Aphelenchoides besseyi
इतर
ह्या रोगाचे खूप जलद दिसणारे लक्षण म्हणजे पानांच्या टोकाचा सुमारे ३-५ सें.मी. भाग पांढरा पडणे, जो नंतर तपकिरी होऊन वाळतो. कोवळी विकसित होणारी पाने वाढतानाही बहुधा चुरगाळलेली, सुरकुतलेली असतात. ही लक्षणे बहुतेकदा वाढीच्या हंगामाच्या मध्यावर म्हणजे दाणे भरण्यास सुरवात होताना जास्त स्पष्टपणे दिसतात. प्रादर्भावित झाडे बहुधा खुजी असतात आणि नेहमीच्या भात झाडासारखी निरोगी हिरवी दिसत नाहीत. जसजसे झाड पक्व होत जाते, कणसं नेहमीपेक्षाही लहान दिसतात आणि अनेक दाणे देखील रिकामे, आक्रसलेले किंवा बेढब असतात. गंभीर प्रादुर्भावात कणसापूर्वीचे शेवटचे पान इतके मुडपलेले असते कि फांदीतुन कणीस पूर्णपणे वर येऊच शकत नाही.
बीज उपचार म्हणून फायदेशीर जमिनीजन्य जीवाणू वापरल्यास, हे जीवाणू मुळांच्या आसपास जागेसाठी सूत्रकृमीशी स्पर्धा करतात आणि त्यामुळे लहान रोपांचे संरक्षण होण्यास मदत होते. काही ठराविक वाढणार्या आच्छादन पिकांसारखे "हिरवळीचे खत" घेऊन त्यांना नांगरताना जमिनीत मिसळल्यानेही जमिनीच्या निरोगीपणास प्रोत्साहन मिळुन सूत्रकृमींवर आपसूक हल्ला होतो. संशोधनात असेही दिसुन आले आहे कि काही ठराविक बुरशीही जमिनीतील किंवा झाडावरील सूत्रकृमींना लक्ष करुन प्रादुर्भावाची पातळी कमी करण्यात मदत करतात.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. सामान्य रसायनिक व्यवस्थापन सूत्रकृमींच्या नाशासाठी ते सक्रिय नसतानाच म्हणजेच कोरड्या बियाणांवर उपचार करण्यावर लक्ष केंद्रीत करते. कारण हा प्रादुर्भाव दाण्याच्या खूप आत असतात किंवा वाढीच्या काळात मुडपलेल्या पानांमध्ये सुरक्षित असतात ज्यामुळे फवारणी देखील निष्फळ होते. जरी शेतात उपचार केले तरी ते झाडाच्या कोवळे असतानाच केले गेले पाहिजेत जेणेकरुन प्रदुर्भाव विकसित होत असलेल्या कणसांपर्यंत पोहोचू शकणार नाही. रसायने किंवा कीटकनाशके वापरत असताना, संरक्षण देणारे कपडे वापरा, लेबलावरील सूचना काळजीपूर्वक वाचा, स्थानिक नियमांचे पालन करा आणि उत्पादने मिसळत असताना, सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी तसेच प्रभावीपणासाठी उचित शिफारशींकडे लक्ष पुरवा.
सूक्ष्म जंतु सूत्रकृमींमुळे हा रोग होतो जो मुख्यत: भाताच्या बियाणांत जगतो आणि पसरतो. हे सूत्रकृमी भात वाळतानाही तसेच साठवणीच्या भातातही सूप्तावस्थेत जाऊन ३ वर्षांपर्यंत जगु शकतात. जेव्हा बियाणे पेरले जाते किंवा ओले होते, तेव्हा सूत्रकृमी जागे होतात आणि सक्रिय होतात. ते, खासकरुन जेव्हा हवा जास्तच आर्द्र असते झाडाच्या पृष्ठभागावरील द्रवाच्या थरातुन पोहत झाडावर चढतात. कोवळ्या झाडाच्या कोवळ्या भागांना खाऊन जगतात. जसजसे झाड पक्व होत जाते तसतसे सूत्रकृमी विकसित होणार्या फुलांवर जातात आणि अखेरीस तयार होणार्या नव्या बियाणांत वस्ती करतात जेणेकरुन नवे चक्र सुरु होते.