Cell injury
इतर
5 mins to read
पानांच्या शीरांमध्ये भाजलेले आणि फिकट तपकिरी धब्बे दिसतात. तसेच फुलांना आणि कोवळ्या फळांना नुकसान होते. पानांवर ओरखडे किंवा छोटी छिद्रे दिसतात आणि घाण वास सुटतो. पाने अकाली गळतात.
ही घटना नैसर्गिक असल्याने कोणतेही जैविक नियंत्रण शक्य नाही.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. ही घटना नैसर्गिक असल्याने कोणतेही रसायनिक नियंत्रण शक्य नाही.
गोठलेल्या दवामुळे नुकसान तेव्हा होते जेव्हा झाडांच्या भागांमध्ये पाणी साचून त्याचा बर्फ बनतो आणि झाडाच्या पेशींचे नुकसान होते, म्हणुन खरतर थंड हवामानापेक्षा बर्फ तयार होण्यानेच झाडांचे नुकसान होते. थंड हवेमुळे मुळांपेक्षाही सदाहरित झाडीतील आर्द्रता नाहीशी होते. ज्यामुळे पाने वाळतात खास करुन टोकाकडे आणि कडांनी. पूर्ण विकसित झालेल्या झाडांपेक्षाही कोवळी रोपे गोठलेल्या दवास जास्त संवेदनशील असतात.