Fusarium oxysporum f. sp. ricini
बुरशी
रोपापासून संपूर्ण वाढलेल्या एरंडीच्या झाडाच्या कोणत्याही टप्प्यावर रोगाचा संक्रमण होऊ शकतो. पहिल्यांदा खालील पाने पिवळी पडून लोंबकळतात. जसजसा रोग वाढत जातो तसतसा हा पिवळेपणा झाडावर वाढत जातो, अखेरीस पाने वाळुन गळतात. काही वेळा पानांचा एकच भाग किंवा झाडाची एकच फांदी वाळते आणि थोड्या काळासाठी बाकीचे झाड निरोगीच दिसते. जर संक्रमित झाड उपटले आणि खोड किंवा सोटमूळ चिरले तर त्यात गडद तपकिरी किंवा काळे पट्टे दिसतात. प्राणी प्रवाहाच्या नसा अवरोधित झाल्याची ही चिन्हे आहेत. खूप कोवळ्या झाडात, जमिनीजवळचा खोड आक्रसतो, ज्यामुळे रोप कोलमडते आणि लगेच वाळते.
ह्या पर्यायात येते बियाणांना किंवा जमिनीस मित्र बुरशी किंवा जिवाणू सारख्यांची मदत होते म्हणुन त्यांस प्रोत्साहन देणे. हे "मित्र" जंतु मुळांसभोवताली वाढतात आणि बुरशीच्या जंतुंना मुळांत शिरणे कठिण होते. निंबोळी पेंड किंवा मोहरीची पेंड सारखे सेंद्रीय पदार्थही जमिनीस दिल्याने जमिनीतील इतर जंतु वाढण्यास प्रोत्साहन मिळतो जे नैसर्गिकरीत्या बुरशीच्या जंतुंचे भक्षक असतात. ह्या सर्व पद्धती जर रोग दिसण्यापूर्वीच वापरल्या म्हणजेच प्रतिबंधात्मक रीतीने वापरल्या तरच फायदा उत्तम मिळतो आणि जमिनीचे स्वास्थ्य चांगले रहाते.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. ह्या रोगाचे व्यवस्थापन रसायनिक उपचारांसह करणे कठिण असते कारण बुरशी जमिनीत रहाते आणि झाडात खोल आत रहाते. कोवळ्या मुळांना वाढत असताना बुरशीने हल्ला करु नये म्हणुन बहुतेक व्यवस्थापन पद्धती पेरणीपूर्व बिजोपचारांवर लक्ष केंद्रीत करतात. एकदा का शेतातील झाडांवर मरची चिन्ह दिसु लागली तर फवारणी संक्रमणाचा नाश करु शकत नाही. म्हणुनच जमिन आणि बीयाणांना निरोगी राखणे महत्वाचे आहे, जेणेकरुन बुरशीस झाडात शिरण्यातच मज्जाव केला जाऊ शकतो.
हा रोग बुरशीमुळे होतो जी जमिनीत रहाते आणि एरंडीच झाड नसल तरी अनेक वर्ष जगते. कडक सूप्तावस्थेतील बीजाणूंच्या रुपात ही जमिनीत किंवा जुन्या झाडांच्या अवशेषात जगते. ही बुरशी झाडात, मुळांना झालेल्या जखमांतुन शिरते. ह्या जखमा मूळ वाढताना होतात किंवा जमिनीतील किड्यांनी आत शिरण्यासाठी केलेल्या असतात. एकदा आत शिरली कि ही बुरशी पाण्याची / अन्नद्रव्याची मुळांपासुन पानांपर्यंत ने-आण करणार्या नसातुन पसरते. बुरशी एकप्रकारचे विष निर्माण करते आणि ह्या नसांना अवरोधित करते ज्यामुळे झाड तहानलेले-भुकेले होते. हा रोग संक्रमित जमिन, वाहते पाणी आणि संक्रमित बियाणांद्वारे पसरतो. जमिनीचे तापमान ऊबदार असल्यास बुरशी फोफावते आणि ज्या शेतात वर्षानुवर्षे फक्त एरंडीचच पीक घेतल जात तिथे बहुधा गंभीर स्वरुपात फोफावते.