ढोबळी मिरची आणि मिरची

मिरचीवरील कवडी रोग

Colletotrichum sp.

बुरशी

5 mins to read

थोडक्यात

  • फळांवर डाग येतात.
  • पान आणि खोडावर गडद तपकिरी कडांचे राखाडी तपकिरी डाग उमटतात.
  • फळांच्या डागांभोवती केंद्रीत वर्तुळे तयार होतात.
  • फांद्यांची मर होते आणि फळे कुजतात.

मध्ये देखील मिळू शकते


ढोबळी मिरची आणि मिरची

लक्षणे

फळांवर पाणी शोषल्यासारखे गोलाकार किंवा कोणेदार डाग उमटतात व कालांतराने मऊ पडून थोडेसे खोलगट होतात. ह्या डागांचे केंद्र एकतर नारिंगी किंवा तपकिरी असते आणि काळे पडतात पण शेजारचे भाग मात्र फिकट रंगाचे राहतात. संपूर्ण फळाचा पृष्ठभाग डागांनी वेढला जाऊ शकतो. एकापेक्षा जास्त डागही येऊ शकतात. फळांच्या डागात केंद्रीत वर्तुळे दिसणेही सामान्य आहे. हिरव्या फळांना आत संक्रमण होते पण ती पिकेपर्यंत लक्षणे दिसत नाहीत. पान आणि खोडावर बारीक अनियमित आकाराचे गडद तपकिरी कडा असलेले राखाडी तपकिरी ठिपके उमटतात. मोसमात नंतर पिकलेली फळे कुजतात आणि फांद्या मरतात.

Recommendations

जैविक नियंत्रण

संक्रमित बियाणे ५२ डिग्री सेल्शियस तापमानाच्या गरम पाण्यात ३० मिनीटे बुडवुन उपचार करता येतात. तापमान आणि वेळ बरोबर साधली पाहिजे तरच उपचाराचा वांछित परिणाम मिळेल.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. जर बुरशीनाशकांची गरज पडलीच तर मँकोझेब असणारे किंवा कॉपरवर आधारीत उत्पाद वापरा. फुलधारणेच्या सुमारास उपचार सुरु करा.

कशामुळे झाले

कोलेटोट्रायकम प्रजातीच्या सी. ग्लोइयोस्पोरिओयाइडस आणि सी कॅप्सिसि सारख्या बुरशीमुळे हा रोग होतो. वाढीच्या कोणत्याही काळात,अपक्व तसेच पक्व फळांवर आणि काढणी नंतरसुद्धा हे जंतु संक्रमण करु शकतात. ही बुरशी बियाणाच्या आत व बियाणाच्या पृष्ठभागावर, झाडाच्या अवशेषात किंवा सोलानेसी कुटुंबातील इतर पर्यायी यजमानात जगु शकते. संक्रमित झाडांचे कलम वापरले असता ही ती नव्याने लागण करु शकते. बुरशी उबदार आणि ओल्या काळात फोफावते आणि पावसाच्या किंवा सिंचनाच्या पाण्याने पसरते. फळांतील लागण १० ते ३० डिग्री सेल्शियस तापमानात होते तर रोगाच्या वाढीसाठी २३ ते २७ डिग्री सेल्शियस तापमान फारच अनुकूल आहे. फळांचे पृष्ठभाग ओले राहिल्यास या रोगाची गंभीरता वाढते.


प्रतिबंधक उपाय

  • जमिनीतील कर्ब सामग्री वाढविण्यासाठी लागवडीपूर्वी शेणखत टाका.
  • पाणी जमा होऊ नये म्हणुन शेतातुन पाण्याचा निचरा चांगला होऊ द्या.
  • जमिन आणि झाडे यांच्यात बीजाणूंचा संसर्ग टाळण्यासाठी ओळींमध्ये अच्छादन करा. आपल्या भागात उपलब्ध असल्यास प्रतिकारक वाण लावा.
  • निरोगी झाडांपासून धरलेले किंवा प्रमाणित स्त्रोताकडील बियाणे लावा.
  • लागवड करण्यापूर्वी पानांवर ठिपक्यांसाठी रोपे तपासा.
  • रोगाच्या लक्षणांसाठी पिकाचे नियमित निरीक्षण करा.
  • शेतातुन आणि आजुबाजुने तण आणि पर्यायी यजमान काढुन टाका.
  • तुषार पद्धतीने सिंचन करु नका आणि फक्त सकाळीच पाणी द्या.
  • विभाजित नत्रासह संतुलित खते द्या.
  • पीक काढल्यानंतर अवशेष जाळुन नष्ट करा.
  • या पिकाचा इतर मिरचीवर्गीय पिके, टोमॅटो किंवा स्ट्रॉबेरीसोबत पीक फेरपालट करणे टाळा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा