Transpiration disorder
इतर
पाण्याने भरलेले फोड आणि पानांच्या खालच्या बाजुस पिवळे ठिपके. ह्यामुळे पाने अनियमित मुडपतात. फोड फांद्या आणि फळांवरही येतात. पाने ठिसुळ होतात आणि हात लावल्यास फाटतात. हे असे होत कारण फोडांमुळे पानाची रचनाच अशक्त होते. जरी गाठींमुळे झाडाच्या एकुणच स्वास्थ्यावर फारसा परिणाम होत नसला तरी भाजी विक्रीसाठी आकर्षक रहात नाही ज्यामुळे आर्थिक नुकसान होते. जर हवामान धार्जिणे असले तर भाजी पिकाच्या सर्व मऊ भागांवर गाठी येऊ शकतात.
ही समस्या किडींमुळे वा रोगांमुळेही उद्भवत नाही; म्हणुन जैविक नियंत्रणाची आवश्यकता आणि संबंधही नाही.
ही समस्या किडींमुळे वा रोगांमुळेही उद्भवत नाही; म्हणुन रसायनिक नियंत्रणाची आवश्यकता आणि संबंधही नाही.
जास्त पाणी देणे, जमिनीतुन पाण्याचा निचरा चांगला न होणे, ढगाळ थंड दिवसात ह्याची लागण होऊ शकते. जेव्हा झाड वापरण्याच्या दरापेक्षा जास्त पाणी शोषतात तेव्हा गाठी येतात. बहुधा ढगाळ दिवशी जेव्हा ऊन पुरेसे नसते, आर्द्रता जास्त असते किंवा हवा चांगली खेळत नसते तेव्हा जास्त पाणी दिल्यानेही गाठी येतात. कोबी आणि टोमॅटो हे, खासकरुन जमिनीत पाणी साचण्यास संवेदनशील असतात. गाठींचे फोड हे हवामान परिस्थितीत सुधार झाल्यानंतरही तसेच रहातात.